नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल नियबाह्य काम करतात. राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका आहे. राष्ट्रपतींनी याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू केली. ते सध्या दिल्लीत असून त्यांनी हे विधान केलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्दा अजूनही अधांतरी आहे. यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वारंवार टीका होत आहेत. यावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं. राज्यपाल नियमबाह्य काम करतात. त्यात राष्ट्रपतींनी लक्ष घालायला हवं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना हे बोलावच लागेल. मी विरोधी पक्षनेता आहे हे सांगावच लागतं, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान मंदिर उघडण्याच्या भाजपच्या मागणीवर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मंदिर आणि शाळा उद्यापासून उघडाव्यात असं मलाही वाटतं. पण मंदिरं जाणीवपूर्वक बंद ठेवलेले नाहीत. आर्थिक कोंडी होतेय हे मान्य आहे. पण करोनाला थांबवण्यासाठी हे गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.