मुंबई – अर्णव गोस्वामी यांनी 83 लाख रुपये थकवल्याने आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात आली असून त्या चिठ्ठीत या साऱ्या प्रकरणाचा तपशिलाने नोंद करण्यात आली आहे.
त्यात चिठ्ठीत अन्वय नाईक यांनी म्हटले आहे की आम्ही खालील कारणामुळे आत्महत्या करीत आहोत. मी अन्वय नाईक आणि माझ्या मातोश्री कुमुद नाईक आम्ही दोघेही आमच्या कंपनीचे संचालक आहोत. खाली नाव नमूद केलेल्या व्यक्तींनी आमचे पैसे बुडवले आहेत.
1. अर्णव गोस्वामी, हे रिपब्लीक टीव्हीचे प्रमुख असून त्यांनी आमचे 83 लाख रुपये थकवले आहेत. त्यांच्या बॉम्बे डाईंग स्टुडिओचे काम आम्ही केले आहे.
2. स्की मीडियाचे फिरोज शेख. त्यांच्या अंधेरीतील आयडिया स्क्वेअर प्रकल्पातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे काम आम्ही केले त्याचे चारशे लाख रुपये त्यांच्याकडून येणे आहे.
3. स्मार्ट वर्क कंपनीचे मालक नितेश सारडा यांच्याकडेही आमचे 55 लाख रुपये पेंडिंग आहेत. या तिघांकडून हे पैसे वसूल करा आणि त्यांनाच आमच्या मृत्यूबद्दल जबाबदार धरा, असे अन्वय नाईक यांनी आपल्या मृत्युपूर्व नोंदीत स्पष्टपणे नमूद केले आहे.