कोल्हापूर (प्रतिनिधी): शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि पीक कर्ज तात्काळ द्या या मागणीसाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आलेल आहे. याचाच भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करत सरकारचा बोजवारा उडाला असल्याचं म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे मोठ नुकसान होत आहे. यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हातात फलक घेऊन सोशल डिस्टनसिंग पळत हे आंदोलन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्या… कोरोणाच्या काळात पोटाची खळगी भरणारा शेतकरी आज खरीप पिकांसाठी आज लावून बसला आहे मात्र सरकारच्या निकषामुळे त्यांना कर्ज उपलब्ध होत नाही… शेतकऱ्यांना त्वरित नवीन कर्ज मिळाले पाहिजे, या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी सादर केले
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सरकार वरती हल्लाबोल करत सरकारचा बोजवारा उडाला असून सरकारनं शेतकऱ्यांना बांधावरती खत बियाणे आणून देतो असं म्हटलं होतं उलट स्वतः कृषिमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक उघड केली. सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले आता नुकसान भरपाई कोण देणार. त्यामुळे तीन पक्षांचा सरकार एकत्र असून बसून निर्णय घ्यायला पाहिजे अनुभवी मंत्री असून ते आपल्या अनुभवाचा काही उपयोग योजना करून घेणे, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.