अकोले – रिपाइं गवई गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश देठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गवई गटाला सोडचिठ्ठी दिली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा त्यांनी निर्णय जाहीर केला आहे.
आठवले गटाची अकोले शासकीय विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत गवई गटाचे माजी जिल्हाध्यक्ष देठे यांनी व गवई गटाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव आदीनी रिपाइं (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केला. रिपाइंचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांच्या उपस्थितीत देठे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गवई गटाचे शंकरराव जगधने, चंद्रकांत भालेराव, विलास जगधने, राहुल साळवे, दत्ता साळवे, सुरेश आव्हाड, आलेश वाघमारे, राहुल पवार, आकाश शिंदे, आयाज खान, प्रकाश भांगरेंसह व्यापारी राजेंद्र रूपवते आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आठवले गटात प्रवेश केला. मंत्री आठवले हे आम्हाला योग्य पर्याय वाटल्याने तसेच जिल्ह्यात सर्व घटकांना सोबत जाणारे नेतृत्व वाकचौरे असल्याने आम्ही आठवले गटात प्रवेश केल्याचे देठे यांनी सांगितले.
बैठकीला ज्येष्ठ नेते दिलीप गायकवाड, सचिन खरात, राहुल पवार, अरुण त्रिभुवन, जनार्दन सोनवणे, राहुल साळवे, दत्तात्रय साळवे, आनंद खरात, उत्तम आढाव, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र आव्हाड, शंकर संगारे, नितीन देठे, रवींद्र देठे, सावळेराम गायकवाड, कमलेश कसबे, किशोर शिंदे, प्रवीण देठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तविक शंकरराव जगधने यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र गवांदे यांनी केले, तर आभार सचिन खरात यांनी मानले.