पुणे – आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. यंदाचा गणेश चतुर्थीचा सण 10 सप्टेंबर पासून सुरु झाला आहे. त्यामुळे सर्वत्र अगदी प्रसन्न वातावरण दिसून येत आहे.
10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य आणि फुले अर्पण केले जातात. या दिवशी प्रत्येकजण आदरपूर्वक गणेशाची पूजा करतो. यावेळी पूजेमध्ये गणपतीला आपली आवडती फुले आणि दुर्वा अर्पण केली जातात. तर चला मग जाणून घेऊयात बाप्पाची पूजा करताना कोणती फुले अर्पण करावी आणि कोणती नाहीत……
केतकी फुले – केतकीची फुले गणपतीला अर्पण केली जात नाहीत. पौराणिक मान्यतेनुसार, केतकीची फुले भगवान शिव यांना अप्रिय आहेत. म्हणून गणपतीलाही ती अर्पण करु नये.
तुळस – शास्त्र आणि पुराणात म्हटले आहे की ‘न तुलस्या गणाधिपम्’. याचा अर्थ गणपतीला तुळस अर्पण करु नये. एकदा तुळशीजींनी गणपतीला लंबोदर म्हणून लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा गणेशजींनी तुळशीला शाप दिला होता आणि तेव्हापासून गणेशाला तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.
वाळलेली शिळी फुले – पूजेमध्ये गणपतीला कोरडी आणि शिळी फुले देऊ नयेत. त्याच्या पूजेमध्ये कोरडी फुले अर्पण करणे अशुभ मानले जाते आणि असे मानले जाते की यामुळे घरात दारिद्र्य येते.
जास्वंदाची फुले – जास्वंदाची लाल आणि पिवळी फुले गणेशाला खूप प्रिय आहेत. म्हणून ही फुले अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात.
झेंडूची फुले – झेंडूची फुले प्रामुख्याने गणेशजीला अर्पण करावीत. हे फूल गणेशजींना खूप प्रिय आहेत. पूजेमध्ये ही फुले अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात.