मॅंचेस्टर – विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरूवात खराब झाल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, 46.1 षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला .
हा सामना पाहण्यासाठी भारतीय चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील स्थानिक भारतीय चाहत्यांनी या सामन्यासाठी रजा घेतली होती. पावसामुळे सामन्यात व्यत्यय निर्माण झाल्यामुळे त्यांची खूप निराशा झाली. हा जर सामना बुधवारी खेळावयाचा झाल्यावर पुन्हा कामाचे ठिकाणी रजा मिळणार नाही. जर सुट्टी घेतली तर कदाचित ही रजा बिनपगारी होईल अशी भीती त्यांना वाटत आहे. कदाचित नोकरीवरही गदा येऊ शकते अशी प्रतिक्रिया या चाहत्यांकडून समाजमाध्याद्वारे उमटली होती.