बावडा -चार महिन्यांपासून राज्यात शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यानुसारच शनिवारी (दि.1) बकरी ईद साजरी करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
ईदनिमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, नमाजही घरीच अदा करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी समीर मुलाणी, चांद सय्यद, अफसर मुलाणी उपस्थित होते.