पुणे – सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुणे विद्यार्थी असल्यास आणि त्यांना प्रमाणपत्राची गरज असल्यास त्यांना तातडीने कागदपत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली.
महापुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवितहानी झालेली आहे. अशा आपत्तीग्रस्त भागातील गावांमध्ये पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मदतकार्य करीत आहेत. त्यात आता विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांची महापुरामुळे कागदपत्रे नष्ट झाली आहेत. त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने शनिवारी प्रसिद्ध केले.
पूरग्रस्त भागात पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी असल्यास, त्यांना ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. पुरामुळे कागदपत्रे नष्ट झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यानां शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, दुय्यम गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्राची गरज आहे, त्यांनी विद्यापीठाकडे अर्ज करावेत.