औरंगाबाद : एकिकडे करोना विषाणूच्या संसर्गाचे थैमान सुरु असताना औरंगाबादमधील पैठण तालुक्यात 5 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुले विवाह मांडावा येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. एकाच वेळी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण निवृत्ती कोरडे (30 वर्षे), सार्थक लक्ष्मण कोरडे (5 वर्षे), अलंकार रामनाथ कोरडे (15 वर्षे), वैभव रामनाथ कोरडे (10), समर्थ ज्ञानदेव कोरडे (10 वर्षे) अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर आसपासच्या गावकऱ्यांनी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा प्राण गेलेला होता. विशेष म्हणजे ही पाचही जण एकाच कुटुंबातील होते.
यात बाप-लेकासह दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. 4 मुले आपल्या कुटुंबातील एका सदस्यासोबत पोहायला गेले होते.
दरम्यान, देशभरात करोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. असे असतानाही एकाचवेळी ही 5 जण शेततळ्यात पोहण्यासाठी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.