बाळासाहेब वाबळे
काऱ्हाटी – गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी नोकऱ्यांवर गंडांतर आल्याने विशेषत: ग्रामीण भागातील युवकांचा ओढा स्पर्धा परिक्षांकडे वाढला आहे. तर कमी शिक्षण व देशसेवा करण्याची इच्छा असणारे सैन्य भरतीमध्ये आपले नशीब आजमावत आहे. यामध्ये आता उच्च शिक्षितांचीही भर पडली आहे. 10 वी व 12 वीसोबत आता अभियंते व पदवीधारकही सैन्य भरतीकडे करिअरच्या दृष्टीने पाहू लागले आहेत.
सकाळ-संध्याकाळी मैदानावर गाळताहेत घाम
इतर कोणत्य क्षेत्रात भरती असो वा नसो मात्र, पोलीस आणि पोलीस भरती सातत्याने निघत असल्याने यामध्ये वारंवार प्रयत्न केल्यास एकदा तरी संधी मिळेल, अशी आशा युवकांना आहे. तसा प्रयत्न केल्यानंतर अनेक जण यामध्ये यशस्वी झालेले आहेत.
भरतीच्या अनुशंगाने हजारो युवकांनी अकॅडमी जॉईन केली आहे. या माध्यमातून भरतीसाठी तयारी करत आहे. त्यामुळे आता भरतीमध्येही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. भरतीच्या सरावा करिता परिसरातील तरुण पहाटे घाम गळत असून सकाळ-संध्याकाळ मैदानावर येऊन व्यायाम करणे भरतीसाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.