पुणे – जनता वसाहतीत गल्लीतील तथाकथीत दोघा भाईंच्या टोळीच्या वादातून दोन खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले आहेत. जनता वसाहतील आपल्याच टोळीचे वर्चस्व असल्याचे सांगत एका टोळीने प्रतीस्पर्धी टोळीच्या सदस्याला फरफटत नेऊन कोयत्याने वार केले. तर त्याचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीने गल्लीत कोयता, लोखंडी रॉड व काठ्यांनी दहशत पसरवत वाहनांची तोडफोड केली.
जमावबंदी व संचारबंदी लागू असतानाही हा प्रकार घडला. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दोन्ही टोळ्यांतील 15 ते 16 आरोपींविरुध्द दाखल केले गेले आहेत. यातील काही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पहिल्या तक्रारीनूसार गल्लीतील भाईगिरीतून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याचा टोळक्याने फरफटत गल्लीत नेऊन कोयता व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी काही सराईतांसह आठ जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर सोपानराव शिवरकर(19,रा.जनता वसाहत , पर्वती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी नवनाथ वाडकर, वैभव मोरे, वैभव राऊत, वैभव शिंदे, संग्राम पाटोळे, शुभम देशमाने, सोमनाथ वाडकर, ऋषीकेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी समीर व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. समीर रविवारी सायंकाळी मित्र संकेत लोंढेसह जनता वसाहतीमधील विठ्ठल मंदिराजवळ बसला होता. यावेळी नवनाथ वाडकर साथीदारांसह तेथे दाखल झाला. त्याने समीरला भाझ्या एरियात येऊन भाईगिरी करतो काय? ईथला भाई मिच आहे’ असा दम भरला यानंतर साथीदारांना सांगितले की, या दोघांची विया दोघांची विकेट काढून वर पाठवू.
यानंतर ईतर आरोपींच्या मदतीने समीरला फरफटत गल्लीमध्ये नेण्यात आले. तेथे लोखंडी कोत्याने डोक्यात, हातावार आणी पायावर वार करण्यात आले. तर इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्कयांनी मारले. तेथे जमलेल्या लोकांना आम्हीच जनता वसाहतीचे भाई आहोत असे म्हणता कोयता व लाकडी दांडक्यांचा धाक दाखवला.
तर उमेश प्रभाकर स्वामी यानी दिलेल्या फिर्यादीनूसार संकेत लोंढे, अक्षय नवले, रोहन जाडे, आदित्य चव्हाण, गणेश जाधव, बाबु उल्हाळकर, हरी शेळके यांच्यावरही खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उमेश घराजवळ असताना यातील आरोपींनी हातात कोयते, लाठ्या काठ्या घेऊन परिसरात दहशथ पसरवत होते. ते फिर्यादीचा टेम्पो व ईतर गाड्यांची तोडफोड करत होते.
यावेळी फिर्यादीची पत्नी त्यांना थांबविण्यास गेली असता, आरोपींनी तीला शिवीगाळ केली. यातील एका आरोपीने फिर्यादी उमेशच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने मारले असता, तीने वार चुकवला. हा वार त्याच्या टेम्पोच्या काचेवर बसल्याने टेम्पोची काच फुटली. तीथे लावण्यात आलेल्या इतर गाड्यांच्याही काचा फोडण्यात आली.यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात करत आहेत.