कोल्हापूर – पथदिवे व सार्वजनिक पाणी पुरवठयाचा वीज पुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या विरोधात माणगावचे सरपंच राजू मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने पथदिवे व सार्वजनिक वीज पुरवठयाची वीज बिल वसुली सुरू आहे. महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सरपंच मगदूम यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता उपोषणाला सुरुवात झाली.
आंदोलनात उपसरंपच अख्तरहुसेन भालदार, अनिल नरसगोंडा पाटील, अभिजीत घोरपडे, प्रकाश पायगोंडा पाटील, रामगोंडा सिद्धगोंडा पाटील, अमोल पारीसा मगदूम, उमेश जोग, हिम्मत म्हालदार, फैय्याज मुल्ला, विराज व्हनागडे, गुंडू हेरवाडे, शिवगोंडा पाटील आदींचा सहभाग आहे.