विश्रांतवाडी – शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना घडतात. पण, शेतकरी महिला कधीच आत्महत्या करणार नाहीत, याचे कारण म्हणजे महिला या परिस्थितीशी नेहमी लढत असतात आणि आपला लढा त्या शेवटपर्यंत सुरू ठेवतात. ज्यांना वंशाचा दिवा पाहिजे असतो त्यांना आपल्या सातव्या पिढीची नावं तरी माहिती असतात का? असे सवाल करीत मुलीच्या जन्माचे स्वागत करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
लोहगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात चाकणकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, हळदी-कुंकू समारंभात सौभाग्यवतींना आमंत्रित केले जाते, त्याचप्रमाणे विधवा भगिनींना बोलावून त्यांचा सन्मान करा.
यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष ऍड. नानासाहेब नलावडे, नगरसेविका रेखा टिंगरे, शीतल सुहास टिंगरे, विश्वास खांदवे, सचिन निंबाळकर, दत्तात्रय खांदवे, हनुमंत खांदवे, संतोष कुंभार, नवनाथ खांदवे, संदीप खांदवे, विशाल मालुसरे, विकास माकणे, साहेबराव मोझे, संध्या खांदवे, सुशिला खांदवे, त्रिवेणी मोझे, सारिका खांदवे, वृषाली खांदवे, आशा गावडे, शोभा खांदवे, सुनीता काळभोर, सुरेखा खांदवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी जि. प. सदस्य अर्जुन गरुड, पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे यांची भाषणे झाली. डॉ.राजेश साठे यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन गायत्री निलेश पवार यांनी स्वागत केले. तर, व्हाइस चेअरमन अंकिता गणेश खांदवे यांनी आभार मानले. गोपिका नवनाथ खांदवे पैठणीच्या मानकरी ठरल्या.