सिल्लोड : सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या पिकांनी हिरावून घेतला आहे. या पावसाने सिल्लोड तालुक्यातील पिके वाया गेली आहेत, शेतात गुडघाभर पाणी साचले, घरे पडली. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत.
शेतकऱ्यांसाठी कुणी आपल्या मदतीसाठी येतंय का याची एकटक वाट बघत असतानाच गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. ते गाडीमधून खाली उतरताच साहेब होत नव्हतं तेवढ गेलं आता आम्ही काय करायचं असं म्हणत शेतकरी सत्तार यांच्या गळ्यात पढून धस ढसा रडले आहेत.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे. रविवारी सिल्लोडच्या गेवराई सेमी येथे एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.