– संतोष वळसे पाटील
पशुधन मृत्युचे प्रमाण वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भीषण दुष्काळानंतर आता पाऊस सुरू झाला आहे आणि शेतात हिरवेगार गवत उगवले आहे. जिथे अजून चारा उपलब्ध नाही तिथे हेच गवत कापून जनावरांना खाऊ घालण्यात येत आहे. यातील कोवळ्या गवतात भरपूर प्रमाणात नायटेट असल्याने काही ठिकाणी विषबाधा होऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे या विषबाधेविषयी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
दुष्काळानंतर उगवणाऱ्या गवतात सतत पाऊस सुरू असताना बाष्प वाढल्याने नायटेटचे प्रमाण वाढते. हे गवत पशुंच्या पोटात गेल्याने रक्तात जलदगतीने नायटेट शोषले जाते आणि रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदय आणि फुप्फुसे निकामी होऊन मृत्यू ओढावतो. हे टाळण्यासाठी जनावरांना कोवळे गवत खाऊ घालू नये. हिरवे गवत कापताना साधारण सहा इंच खोडापासून अंतर ठेवून कापावे. हिरव्या गवतासोबत कोरडा चारा किंवा इतर चारा मिश्रण करून द्यावा.
चांडोली, अवसरी, पारगाव येथे गेल्या तीन महिन्यांत कोवळे गवत खाल्ल्याने सहा गायीचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेलसरवाडी-निरगुडसर येथे मेंढपाळाच्या 55 मेंढ्या मृत पावल्या होत्या आहेत.