बेल्हे (पुणे) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेताला तळ्याचे स्वरुप आले असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बांगरवाडी, बेल्हे, राजुरी, आळे, निमगाव सावा, साकोरी, पारगाव, मंगरूळ, आणे, पेमदरा, नळवणे, गुळंचवाडी, बोरी, जाधववाडी, तांबेवाडी व परिसरातील गावामध्ये गेली सहा ते सात दिवस मोठ्या प्रमाणत सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शेताताच पाणी साचून राहिले असल्याने सोयाबीन व कांदा पिके पाण्याखाली गेले आहे. तर जनावरांचा चारा ही बऱ्याच ठिकाणी जमीनदोस्त झाला आहे.
या भागात ढगाळ वातावरण रहात आहे. तसेच त्याचा फटका पिकांना बसत आहे. उगवलेले कांदा पीक काहीठिकाणी पाण्यामुळे वाहुन गेले आहे. या पावसामुळे झेंडू पिकाचे देखील मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्ग त्रासला आहे.