मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी परिषदेत भाजपवर गंभीर आरोप करत आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, अशी देवेंद्र फडणवीसांना दिली. यावर आता देवेंद्र फडणवीस गोव्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले,’सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाहीत. मी इतकं नक्कीच सांगू शकतो कि, मोदीजींच्या सरकारमध्ये कुणालाही व्हिक्टिमाईज कधीही केलं जात नाही. संजय राऊत हे एक व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. संजय राऊत हे एक संपादक आहेत आणि संपादकाला माहिती असतं कि, हेडलाईन कशी घ्यावी आणि दिवसभर आपलं नाव कसं चालेल… त्या प्रकारे ते वक्तव्य करत असतात.’ असं म्हणत संजय राऊतांच्या लेटरबॉम्बवर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया दिली आहे.