‘शिवाजी महाराजांचा नवा पुतळा साकारण्याची जबाबदारी अनुभवी शिल्पकार राम सुतार..’ अजित पवारांनी दिली माहिती…

Ajit Pawar । सिंधुदुर्गमधील किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या जयदीप आपटे नावाच्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, आम्ही त्याला नक्की आपटणार असं म्हणत नितेश राणेंनी पुतळा बनवणाऱ्या ठेकेदार आपटेला इशारा दिला आहे.
सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावरून मोठी घोषणा केली आहे.
अजित पवार म्हणाले,’सोमवारी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या सगळ्यांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटतायत, मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी यासंदर्भात मला माहिती दिली. अनावरणाच्या वेळी सगळं चांगलं आणि व्यवस्थित होतं. लवकरात लवकर चांगल्यात चांगला पुतळा कसा उभारता येईल? यासाठी आम्ही चर्चा केली. काही लोक असं म्हणतात की, गेल्या वेळस घाई झाली होती, त्यासंदर्भात लोकांनी भाष्यही केलं. यासोबतच नवा पुतळा कोण उभारणार, याबाबतही अजित पवारांनी बोलताना सांगितलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले,’शिल्पकार राम सुतारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पुतळ्याच्या पुढील घडणीसंदर्भात चर्चा झाली, प्रत्येकानं आपापलं तारतम्य बाळगलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे (ठाकरे-राणे राडा) पुतळा पुन्हा उभारण्याचं काम ज्याला दिलं जाईल, त्याचा सगळा इतिहास-अनुभव लक्षात घेऊनच केला जाईल. असेही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
शिल्पकार राम सुतार यांच्याबाबत सांगायचं झाल्यास…
राम सुतार यांनी अयोध्येतील कुबेर टेकडीवर स्थापन करण्यात आलेली 300 फुट उंचीची पितळेची जटायूची घडवलेली आहे. ही मूर्ती पद्मश्री राम वानजी सुतार यांनी त्यांचा मुलगा अनिल यांच्या मदतीनं नोएडा येथील त्यांच्या कार्यशाळेत बनवली आहे.
ते गेल्या 70 वर्षांपासून शिल्प बनवत आहेत. आपल्या 98 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आतापर्यंत 8 हजारांहून अधिक शिल्प घडवली आहे. राम सुतार यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली ऑर्डर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिली होती. 1947 साली राम सुतार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बनवण्यास सांगितलं होतं.
सध्या राम सुतार यांनी तयार केलेला पुतळा संसद भवनात बसवण्यात आला आहे. तेव्हापासून सुतारांनी अनेक उत्कृष्ट पुतळे बनवले आहेत, ज्यात 45 फूट उंच चंबळ देवी पुतळा, 21 फूट उंच महाराजा रणजित सिंह पुतळा, 18 फूट उंच सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, 9 फूट उंच भीमराव आंबेडकर पुतळा इत्यादींचा समावेश आहे. आता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचं काम राम सुतारांना दिलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.





