सातारा – डझनभर वेळा उद्घाटन होऊनही कवठे-केंजळ योजना पूर्णत्वास नेण्यास अपयशी ठरलेले आणि गेल्या दहा वर्षात एकही विकासकाम करता न आलेले विद्यमान लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपशयी ठरले आहेत, अशी घणाघाती टीका किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केली.
भाजपचे वाई मतदारसंघातील उमेदवार मदन भोसले यांनी ओझर्डे गटातील केंजळ, मयुरेश्वर, गुळुंब, चांदक, आनंदपूर, वेळे, सुरूर, मोहोडेकरवाडी, वहागाव,कवठे, जोशी विहीर, अनवडी, शिरगाव आदी गावांमध्ये भेटीद्वारे प्रचाराला सुरुवात केली. किसनवीर कारखान्याचे संचालक सी. व्ही. काळे, प्रवीण जगताप, प्रताप यादव, पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, संदीप पोळ, जिजाबा पवार, केतन भोसले, ऋतुराज चव्हाण, डॉ. सौ. सुरभी भोसले-चव्हाण, आनंदराव चौधरी, संतोष येवले, प्रदिप क्षीरसागर, दिलीप चौधरी, विलासराव जगताप, जगन्नाथ जगताप, संतोष मोरे, विठ्ठल येवले, प्रकाश जगताप, विवेक कदम, अंकुशराव पवार, सुरेश भिलारे, अविनाश गोळे, राजेंद्र गोळे, शंकर सणस, राजेंद्र गोळे, अंकुश भिलारे, गणेश संकपाळ, राजेंद्र खामकर, चंद्रकांत जाधव, किशोर भिलारे, मोज भिलरे, मनीलाल कणसे, प्रताप यादवसर, विजय यादव, विठ्ठल यादव, सुनिल यादव, सागर जाधव, गणेश जाधव, सरस्वती पवार, एकनाथ पवार, दशरथ पवार, भुजंग पवार, अशोक ननावरे, विश्वास पवार, केशव पिसाळ, स्वप्निल कांगडे, डॉ. अशोक कदम, गणपत भिलारे व पदाधिकारी उपस्थित होते.
मदन भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरचे 370 कलम रद्द केल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर राहणे आवश्यक असल्याने उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आता आपणही उदयनराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना पुन्हा लोकसभेवर पाठवावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राला संपन्न करण्याचे स्वप्न आहे.
गेल्या दहा वर्षात या मतदारसंघामध्ये विकासकामे थंडावली आहेत. नुसत्या गाठीभेटी, वाढदिवस केल्याने विकास होतो, असे असते तर दहा वर्षामध्ये खूपच विकास झाला असता. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. आता आपणच ठरवावे की, लोकप्रतिनिधी टवाळक्या करणारा असावा की विकास करणारा? या निवडणुकीत मला व उदयनराजे भोसले यांना विजयी करा.