Women’s Day | Maya Vishwakarma – दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः महिलांना समर्पित आहे. ज्या स्त्रीने तिच्या आयुष्यात सॅनिटरी पॅड्सचे नावही ऐकले नव्हते, त्या माया विश्वकर्मा आता ‘पॅड वुमन ऑफ इंडिया’ बनल्या आहेत. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील मेहरागाव गावच्या रहिवासी माया विश्वकर्मा यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांना आता ‘पॅड-जीजी’ म्हणूनही ओळखले जाते. माया विश्वकर्मा यांनी अमेरिकेतील आपले घर सोडले आणि भारतात सुकर्मा फाउंडेशनची स्थापना केली. सुकर्मा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ग्रामीण महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड पुरवतात. त्यांनी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे संशोधन कार्य केले. नंतर अमेरिकेत, त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को येथून रक्त कर्करोगावर संशोधन केले आणि २००८ मध्ये पीएचडी पूर्ण केली. माया विश्वकर्मा यांनी वयाची २६ वर्षे गाठली तरी पॅडचे नाव कधीच ऐकले नव्हते आणि वापरलेही नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक समस्या आणि संसर्ग झाले. आपण नेहमीच बचत करण्याचा विचार करतो. कुठेतरी हे शिक्षण आणि जागरूकतेशी देखील संबंधित होते. म्हणून अमेरिकेला जाताना त्यांनी यावर उपाय शोधायला सुरुवात केली. म्हणूनच त्यांनी सुकर्मा फाउंडेशनची स्थापना केली. सुकर्मा येथे आम्ही नो टेन्शन नावाचे सॅनिटरी पॅड तयार करण्यास सुरुवात केली. तिथे या संस्थेने स्थानिक महिलांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांना पॅड कसे बनवायचे हे शिकवले. त्यानंतर जनजागृती मोहिमा सुरू झाल्या. जागरूकता मोहिमेचा एक भाग म्हणून, मी मध्य प्रदेशातील सुमारे १५-१६ आदिवासी जिल्ह्यांना भेट दिली आहे. ग्रामीण भागात असे दिसायचे की, ते सर्व लोक अजूनही पूर्वीसारखेच मागासलेले आहेत. तिथल्या शाळा चांगल्या नाहीत, पाणी किंवा वीज नाही आणि महिलांच्या समस्या वाढत आहेत. त्यावेळी विश्वकर्मा यांना वाटलं होतं की, आपण अमेरिकेत येऊ, चांगल्या नोकऱ्या मिळतील, सगळं ठीक होईल, पण गाव कोण सांभाळणार? त्यांच्या परिसरातील महिलांना स्वच्छतेच्या आणि मासिक पाळीच्या समस्या होत्या. १० वर्षांपूर्वी कोणीही या समस्यांबद्दल बोलत नव्हते. म्हणून विश्वकर्मा यांनी विचार केला की या समस्येवर काम का करू नये? सुरुवातीला त्यांना पॅड मॅन अरुणाचलम मुरुगनाथम यांचे मार्गदर्शनही मिळाले. त्यामधून हे मोठे काम उभे राहिले आणि आज माया विश्वकर्मा यांना पॅड वुमन ऑफ इंडिया हीच ओळख मिळाली आहे. ‘पॅडमॅन’ : कधी उघड न बोलल्या जाणाऱ्या विषयाला फुटली वाचा…. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ट्विंकल खन्ना यांच्या ‘द लेजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकावर आधारित असेल, जो अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे, जे तामिळनाडूचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी कमी किमतीचे सॅनिटरी नॅपकिन्स मशीन तयार करून ग्रामीण भारतातील मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या संकल्पनेत क्रांती घडवली. पॅडमॅन अरुणाचलम यांच्या कथेभोवती फिरते ज्यांनी कमी किमतीचे सॅनिटरी पॅड शोधले. या सिनेमाच्या माध्यमातून कधी उघड न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फुटली आहे. आर. बाल्की दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर भाष्य करतो. या सिनेमात अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेत्री सोनम कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.