पंढरपूर : आषाढी एकादशी निमीत्ताने आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सपत्नीक पुजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळाचे सावट कमी करून बळीराजाला समृद्ध करण्याचे साकडे पांडुरंगाला घातले.
राज्यातील जनतेच्या सर्व अपेक्षा पुर्ण करून जनतेला सुखी करण्याची प्रार्थनादेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, यंदा लातुरच्या अहमदपूर तालुक्यातील विठ्ठल मारुती चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांसह पांडुरंगाच्या पुजेचा पहिला मान मिळाला आहे.