Raj Thackeray Post : नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी केली जात आहे. आरोपीला न्यायालयाने 7 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Raj Thackeray Post) या हृदय पिळवटून आणि चीड आणणाऱ्या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून त्यांनीही आरोपीला कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे. अशातच आता या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारला काही सवाल विचारले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सविस्तर भाष्य केले आहे. (Raj Thackeray Post) Raj Thackeray Post : त्याला हालहाल करत संपवा..! नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा संताप; राज्य सरकारला कडक शब्दांत सुनावलं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले की, साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक असून मन हेलावून टाकणारी आहे. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.” अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडून अशा घटनांमध्ये ‘फास्ट ट्रॅक’ कारवाईची घोषणा केली जाते, मात्र त्याची नेमकी व्याख्या काय आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असल्याकडे त्यांनी पोस्टमधून लक्ष वेधत कायद्याचा धाक कमी झाल्याचे म्हटले आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल… — Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2026 तसेच, या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याच्या बातम्यांवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. “ही तत्परता गुन्हेगारांवर का दिसत नाही?” असा सवाल संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray Post) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उद्देशून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आरोपीला शिक्षा होईलच, पण अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा सखोल विचार होणे गरजेचे आहे. स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. घटना घडल्यानंतर काही दिवस जनतेत संताप व्यक्त होतो, मात्र नंतर सर्व विसरले जाते. यावर दीर्घकालीन उपाययोजना आणि ठोस कृती होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा : Jui Gadkari: “आईच्या साडीत जुई गडकरीचा मोहक अंदाज; ‘सायली’च्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!”