नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची कसरत सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि रघुवर दास यांना उत्तर प्रदेशचे निरीक्षक बनवण्यात आले आहे.
त्याचवेळी मीनाक्षी लेखी आणि राजनाथ सिंह उत्तराखंडमध्ये ही जबाबदारी सांभाळतील. त्याचप्रमाणे गोव्यात नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन तर मणिपूरमध्ये निर्मला सीतारामन आणि किरेन रिजिजू यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे.