पुसेगाव -आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामांचे जाळे निर्माण केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांना निवडून द्या, असे आवाहन आ. नीलेश लंके यांनी केले. आ. शशिकांत शिंदे हे द्वेषाचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करतात. या मेळाव्यातील गर्दीमुळे त्यांची लोकप्रियता दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जांब, ता. खटाव येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, दगडूदादा शिंदे, संदीप मांडवे, चेअरमन बाळासाहेब जाधव, बाळासाहेब इंगळे, वसंतराव जाधव, सुखदेव रणसिंग, जितेंद्र शिंदे, मधुकर जाधव, विठ्ठल साळुंखे, जालिंदर बिटले, रामचंद्र शिंदे, तुकाराम शिंदे, रणजित शिंदे, सोमनाथ शिंदे, मधुकर ढाणे, विलास जाधव, विठ्ठल चव्हाण, विकास शिंदे, तानाजी देशमुख, विनोद शिर्के, धनाजी टकले व ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार आहेत. कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पक्षवाढीसाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. शिंदे-फडणवीस सरकार मी पाडेन, याची त्यांना भीती वाटत आहे. त्यांच्याकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. माझे घर त्यांनी फोडले आहे. मी मरेपर्यंत शरद पवारांशी निष्ठा ठेवणार आहे. कोणी कुठेही गेले, तरी मला व पक्षाला फरक पडणार नाही. खटाव तालुक्यात
पाणीटंचाई असल्याने, नेर तलावातून येरळा नदी व कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने
पाणी सोडले होते. मात्र, विद्यमान लोकप्रतिनिधींनी राजकीय दबाव आणून, प्रशासनाला हे पाणी बंद करायला भाग पाडले.
अशा प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. विधानसभा निवडणुकीत जनता मतदानाच्या रूपाने याची परतफेड व्याजासह करेल. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांची लोकप्रियता कमी झाली असून, महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढत आहे. 2024 मध्ये राज्यात महविकास आघाडीचे सरकार येईल. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदेच असतील.