Eknath Shinde On Bhavana Gawli : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना आपण विद्यमान खासदार भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली. शिवसेनेने यंदा यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचे लोकसभेचे तिकीट कापले आहे. यामुळे भावना गवळी चांगल्याच नाराज झाल्या आहेत. परिणामी, शिंदेंनी त्यांना वाऱ्यावर न सोडण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल केली.
राजश्री पाटलांसाठी शिंदेंनी विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापली आहे. त्यामुळे त्या गुरुवारी राजश्री पाटील यांची उमेदवारी दाखल करतानाही गैरहजर राहिल्या. त्यामुळे भावना गवळी प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गवळी यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला आहे. | Eknath Shinde On Bhavana Gawli
राजश्री पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत एकनाथ शिंदे यांनी भावना गवळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राजकारणात आपल्याला काही कटू निर्णय घ्यावे लागतात. पण कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. पण आम्ही महायुतीचा अनादर करणार नाही, असे एकनाथ शिंदे खासदार भावना गवळींना उद्देशून म्हणाले. | Eknath Shinde On Bhavana Gawli
Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींनी कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत? संपूर्ण यादी पहा