पुणे, दि. 28 – राज्य शासनाने सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यालयांत बैठक व्यवस्था, सुशोभिकरण, स्वच्छता व नीटनेटकेपणा येणार असून कार्यालये चकाचक होणार आहे.
सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छतेबाबत विशेष उपाययोजना करण्यात यावी. अभिलेखांचे जतन करण्याचे काम करण्यात यावे. कार्यालयातील अभिलेखांची अ, ब, ,क, ड वर्गवारी करण्यात यावी. जतन करण्याची कागदपत्रे अभिलेख कक्षात पाठविण्यात यावी. तर कालबाह्य कागदपत्रे यादे करून ती नष्ट करण्यात यावी. तसेच सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करावी, अशा सूचना विभागीय उपायुक्त यांनी सर्व कार्यालयांना दिल्या आहेत.
प्रशासन गतिमान करण्यासाठी सर्व महत्वाची वैयक्तिक कागदपत्रांचे जतन करण्यासाठी डीजी लॉकर प्रणालीच्या वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक विभागाने त्यांच्या सेवा शासनाच्या आपले सरकार पोर्टलशी लिंक कराव्यात. शासनास पत्रव्यवहार करताना कागदपत्रे समक्ष न पाठवता स्कॅन करून
ई-ऑफिस प्रणालीचा वापर करून डिजिटल पाठविण्यात याव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व सरकारी कार्यालयांना दिल्या आहेत.