जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें। विहित परी अप्रमादें। अनुष्ठावें । ऐसेनि सद्भावें कर्म करावें ।
जे देहाभिमानाने बद्ध झाले आहेत, त्यांनी निषिद्ध व काम्य कर्मे टाकून विहित कर्मे निरभिमानबुद्धीने करावी. अशा रीतीने सद्भावाने कर्माचे आचरण करावे. असा देवांनी तिसरे अध्यायांत निर्णय केला आहे, म्हणून या चौथ्या अध्यायाला कर्मकांड असे म्हणावे, त्या नित्यनैमित्तिक कर्माचे आचरण केले असता ती अज्ञानाचा कसा नाश करतील,
अशी इच्छा होऊन बद्ध हा मुमुक्षुत्वाच्या पायरीला आला तर त्याच्याकरीता तीच सर्व कर्मे ब्रह्मार्पणबुद्धीने करावी, असे देवांनी सांगितले. जी जी विहितकर्मे (कायिक, वाचिक व मानसिक) तू करशील, ती सर्व कर्मे ईश्वरप्रसन्नते करताच करून ईश्वरार्पण कर असे सांगितले.