बिहार -बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी मध्यान्ह आहारामुळे 40 विद्यार्थी आजारी पडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यान्ह आहारात पाल पडली होती असे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी तपास केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी शोभेंद्र कुमार चौधरी यांनी सांगितले आहे. मध्यान्ह आहाराच्या बाधेमुळे यापूर्वी बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याने प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये याकरिता सर्व शाळांच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.