नवी दिल्ली – जर तुमचा मोबाईल चोरीला किंवा हरवला तर तुम्हाला आता इथून पुढे कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आता तुमचा मोबाईल शोधून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार विभागाने मंगळवारी ‘संचार साथी’ नावाने पोर्टल लाँच केले आहे.
या पोर्टल मुळे तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन तुमच्या जवळ किंवा भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी तुम्ही या नवीन पोर्टलद्वारे त्यावर बारीक नजर ठेवू शकणार आहात.
या पोर्टल बद्दल केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपले मत व्यक्त केले आहे ते म्हणाले की, ‘संचार साथी’ पोर्टलच्या माध्यमातून लोक जुन्या उपकरणांची खरेदी करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासू शकणार आहेत. तसेच हरवलेला आणि चोरी गेलेला मोबाईल लोक शोधून काढू शकणार आहेत.”
दरम्यान, लोकांच्या फसवणुकीच्या तक्रारीमुळे 36 लाख मोबाईल कनेक्शन तोडण्यात आले असून त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंटही ब्लॉक करण्यात आले आहेत.