बॉलीवूड अभिनेत्री दिव्या भारती आज या जगात नाही पण तिच्या नावाची नेहमीच चर्चा होते आणि येणाऱ्या काळातही होत राहील. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि वयाच्या 19 व्या वर्षी या अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला. या तीन वर्षांत दिव्याने स्वत:ची सुपरहिट अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली होती. कामामुळे ती नेहमीच चर्चेत असायची, पण एक गोष्ट अशी आहे की, दिव्याचे पर्सनल लाईफही खूप चर्चेत होते. दिव्या भारतीने साजिद नाडियादवालासोबत लग्न केले. मात्र याबाबत कोणालाच माहिती नव्हती. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत आहोत, ज्यात लहान वयात धर्म बदलण्यापासून विवाह करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
दिव्या भारतीचे बॉलिवूड करिअर –
दिव्या भारतीने वयाच्या 16 व्या वर्षी बोबिली राजा या तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडकडे पाऊल ठेवले. बॉलिवूडमध्ये, दिव्या भारतीने अल्पावधीतच एक हिट अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांचा ‘विश्वात्मा’ चित्रपट खूप यशस्वी झाला आणि या चित्रपटातील ‘सात समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई’ हे गाणे आजही रसिकांच्या ओठावर आहे. यानंतर दिव्या भारतीने अवघ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत ‘शोला शबनम’, ‘दीवाना’ सारख्या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपट दिले.
वयाच्या 18 व्या वर्षी केले लग्न –
दिव्या भारती आणि साजिद नाडियादवाला यांचा विवाह 10 मे 1992 रोजी झाला होता. दिव्या आणि साजिद यांची पहिली भेट ‘शोला और शबनम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. इथे गोविंदाने दोघांची ओळख करून दिली. साजिद अनेकदा चित्रपटाच्या सेटवर दिव्या भारतीला भेटायला जायचा आणि हळूहळू दोघांची प्रेमकहाणीही सुरू झाली. यानंतर दिव्या भारती आणि साजिदचे लग्न झाले. पण लग्नापूर्वीच दिव्याने तिचा धर्म बदलला होता. रिपोर्ट्सनुसार, तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याचे नाव दिव्यावरून बदलून ‘सना’ केले.
जगापासून लपवून ठेवलं लग्न –
दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांनी सुरुवातीच्या काळात आपले लग्न जगापासून गुप्त ठेवले होते. याचे कारण खुद्द साजिदने एका मुलाखतीत सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘दिव्याचे करिअर धोक्यात आल्याने आम्ही लग्नाची बाब लपवून ठेवली होती. पण दिव्याला नेहमी आमच्या लग्नाबद्दल जगाला सांगायचे होते. असे करू नकोस असे मी तिला वारंवार सांगितले. पण आता असं वाटतंय की मी असं करायला नको होतं.’
दिव्या भारतीचा मृत्यू कसा झाला?
दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 5 एप्रिल 1993 रोजी या जगाचा निरोप घेतला. दिव्याला तिचे वैवाहिक आयुष्य केवळ 11 महिनेच पाहता आले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाचव्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून पडल्याने दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. मात्र, अनेकांनी दिव्याच्या मृत्यूला हत्या म्हटले, तर काहींनी त्याला अपघात असे नाव दिले.