पुणे – शहरी भागांमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश घालूनच शाळेत जावे लागते मात्र दुर्गम भागातील अंगणवाडीत शिकणाऱ्या आदिवासी मुलांना गणवेश हि संकल्पनाच माहिती नाही किंवा तशी सोयही नाही. मुलांनी अंगणवाडीत येतांना एकसारख्या ड्रेस मध्ये यावे व त्यासाठी गणवेश हेच माध्यम आहे असे मत आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा. आर. धारीवाल यांनी पालघर जिल्यातील तलासरी तालुक्यातील उपलाट येथील तीर्थधाम जिनशरणं येथे गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी अंगणवाडीतील एकाच वेळी ६५० पेक्षा जास्त मुलांना मोफत पाटी, पाटी पेन्सिल्स व गणवेषाचे वाटप हि संकल्पना आर एम डी फाऊंडेशन द्वारा राबविण्यात आली. याप्रसंगी गुरुपौर्णिमा चे औचित्य साधून मुलांना गणवेश योजना राबवून मुलांना जो आनंद दिला आहे ती माझ्यासाठी मोठी भेट आहे.
माझ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान लहान मुलांना आणून माझे व्यासपीठ आणखी सुंदर व भव्य केले आहे असे गौरवोद्धार जैन मुनिश्री आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांनी काढले. याप्रसंगी उपस्थित बाल विकास अधिकारी गणेश मांटे यांनी मुलांना गणवेशात पाहून खूप आनंद झाला असे मत व्यक्त केले.
तर गणवेशातून मुलांना एक शिस्त लागते असे मत तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी व्यक्त केले. अंगणवाडी सेविका गीता जाना डबके यांनी गणवेश परिधान केलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसून येतो असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना चाफ्याची झाडं वितरीत करण्यात आली.
सर्व मुलांना, त्यांच्या पालकांना व अंगणवाडी सेविका. मदतनीस यांच्याकरिता गौतमीप्रसाद कार्यक्रम यावेळी आयोजित केला होता. गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित या कार्यक्रमात शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, अंगणवाडी चा स्टाफ, पर्यवेक्षिका, देशभरातून आलेले जैन समाजातील प्रतिष्ठित तसेच उपलाट गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.