“त्या’साठी क्वचितच शेतकरी…
शेतकरी सन्मान योजना लोकसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर लागु केली यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकांचे खातेनंबर दिले; मात्र क्वचित शेतकऱ्यांनीच नॅशनल बॅंकेची खाती जोडली त्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये जमा झाल्याचे मोबाइलवर संदेश येऊ लागले. मात्र, सहकारी बॅंकांच्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा होत नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी नॅशनल बॅंकाकडे खाती उघडण्यास सुरुवात केली.
राजगुरूनगर – पीक पंचनाम्यासाठी बाधीत शेतकऱ्यांनी विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या नॅशनल बॅंकाची खाते नंबर जोडले आहेत. एकाच गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांची एकूण झालेल्या रक्कमेचा धनादेश एकाच बॅंकेत खाती नसल्यामुळे प्रशासनाला शेतकऱ्याच्या नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र धनादेश काढण्याची नामुष्की आली.
ग्रामीण भागात सोसायटीचे बहुतेक शेतकरी सभासद असतात दरवर्षी पीक कर्ज घेताना सहकारी बॅंकातून बहुतेक शेतकऱ्यांची खाती असताना पिकपंचनामे करताना शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई लवकर मिळण्यासाठी सहकारी बॅंकाऐवजी वेगवेगळ्या नॅशनल बॅंकाची खाती जोडण्यात आल्यामुळे महसूल प्रशासनाला गावनिहाय प्राप्त अर्जाबरोबरच बॅंकखाती पाहुन वर्गीकरण करण्यातच वेळ जाऊ लागला आहे.
त्यामुळे जवळपास 15 पेक्षा अधिक बॅंकांचे धनादेश काढून बाधीत शेतकऱ्यांची नावे जोडून संबंधित बॅंकाकडे पोहच करण्यासाठी सजातील तलाठी भाऊसाहेब गुंतुन गेला आहे. काही बाधीत शेतकऱ्यांनी पुणे, मुबंई अन्य शहरातील बॅंक खाती जोडल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन धनादेश देण्याची नामुष्की ओढवली असल्याने या किचकट प्रक्रियेत वेळेवर निधी वितरीत करण्यात अडथळे आल्याचे दिसुन आले.