Kailas Patil : ओमराजे साथ सोडणार याची कुणकुण उद्धव ठाकरेंना आधीच लागली होती? कैलास पाटलांना दिली होती ‘ही’ सूचना
Kailas Patil : मात्र, सहा खासदारांनी व्हीपला डावलून ते बैठकीला गैरहजर राहिल्याने अॅापरेशनन टायगर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

Kailas Patil : राजकारणात कधी काय होईल याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या खासदार फुटीवरुन लक्षात येतो. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांनी साथ देण्याचा निर्णय घेतला. तसेच शिंदेंसोबत 12 खासदारही आले. या बंडांमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. या घटनेला आता चार वर्षांचा काळ लोटला आहे.
आता चार वर्षांनंतर अॅापरेशन टायगरची व्यूह्यरचना आखून एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला. उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांना गळाला लावण्यात त्यांना यश आल्याची चर्चा आहे. आज या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नऊ खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र, सहा खासदारांनी व्हीपला डावलून ते बैठकीला गैरहजर राहिल्याने अॅापरेशनन टायगर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
या सहा खासदारांमध्ये सर्वात चक्कित करणार नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आहे. ते कधीही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितलं आहे. याबाबत आता ओमराजे यांचे मित्र आणि आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले कैलास पाटील? (Kailas Patil)
“ते जातात का नाही. याबात संदिग्धता कायम आहे. ही अफवा असावी अशी माझी मनोमन भावना आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकसंध राहावा आणि येथून पुढे कायम उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहावे हीच माझी इच्छा आहे.”
त्या विधानावरुन रंगली चर्चा (Kailas Patil)
त्यांच्याशी (ओमराजे निंबाळकर) बोलणं झालं असल्याच्या प्रश्नावर कैलास पाटील यांनी महत्वाची माहिती दिली. परवा केससंदर्भात बोलणं झालं होतं. संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण संपर्क होऊ शकला नाही. संपर्क करून त्यांच्याशी भेटून बोलणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पुण्यात गेलो होतो; पण माझी भेट होऊ शकली नाही. या विधानावरुन ओमराजे साथ सोडणार असल्याची कुणकुण उद्धव ठाकरे यांना लागली होती, अशी चर्चा सुरू झाली आहे.






