नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू यांना नुकतीच करोनाबाधा झाली. त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घेतली का, असा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी केला.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सुखू आठवडाभरापूर्वी सहभागी झाले. त्यानंतर तीनच दिवसांनी सुखू यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचा संदर्भ देऊन ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस आणि राहुल यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
राहुल यांच्याबरोबरच यात्रेत सहभागी असणारे इतर जण करोना चाचण्यांना सामोरे गेले का? करोनाविषयक नियमांचे पालन कॉंग्रेस करणार नाही का? त्या नियमांपेक्षा एखादा पक्ष किंवा एखादा परिवार मोठा आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
Gadchiroli : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील चकमकीत 2 माओवादी ठार; सुमारे 10 किमी पर्यंत…
देशात नव्याने करोना फैलाव झाल्यास कॉंग्रेसच्या नेत्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये याआधीच सुरू झालेले शाब्दिक युद्ध आणखी तीव्र बनण्याची शक्यता आहे.