नाशिक – महाराष्ट्रामध्ये कुणीही काम करताना अल्टीमेटम दिल्यानंतरही कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. कारण हे कायद्याचे राज्य आहे. कुणाला वाटत असेल की, मी असं बोललो की असं होईल. परंतु असं काहीही चालणार नाही. मग तो कुणीही असो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक इशारा दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर 3 मे पर्यंत हटवण्याच्या मागणीवर आक्रमक पवित्रा स्वीकारल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांसमोर आव्हान निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अजित पवारांची कठोर भूमिका घेतली.
अजित पवार म्हणाले, लोकांना भडकवणे सोपे आहे, पण त्याचे परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत, जे राज्याला परवडणारे नाही. महाराष्ट्रात हुकूमशाही होऊ देणार नाही. कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. येथे कायद्याचे राज्य आहे आणि कायदा सर्वांसाठी समान असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे. जर कोणाला वाटत असेल की गोष्टी त्यांच्याप्रमाणे घडतील, तर तसे होणार नाही. प्रत्येकाने कायदा आणि संविधानाचे पालन केलेच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
तसेच कोणताही निर्णय घेतला तरी तो सर्वांना लागू व्हायला हवा. फक्त ींवरील लाऊडस्पीकर काढले जातील आणि इतरांना हात लावला जाणार नाही, अशा गोष्टी होणार नाही, असेही पवार म्हणाले.