Dhirendra Shastri । बागेश्वर धाम बाबा हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. मानव धर्माचें संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्या विरुध्द केलेले वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भंडारामधील मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सूरजलाल अंबुले यांच्या तक्रारीवरून धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे.भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार आयोजित करण्यात आलाय. यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केले होते.
काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री ? Dhirendra Shastri ।
नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बागेश्वर बाबा यांनी मोहाडीत बाबा जुमदेवजी आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. यावेळी ते म्हणाले की, नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे.
ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचे नाही, जय गुरुदेव बोला…. जो हनुमान संपूर्ण जीवनभर राम राम बोलला, त्यांचे उपासक राम राम नाही बोलणार. हद्द झाली यार…. रसगुल्ला खात आहेत…. मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहेत. तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात केले.
स्वतःच्या वक्तव्यावरून पलटी Dhirendra Shastri ।
काल स्वतःच्या वक्तव्यावरून अडचणीत आल्याचे लक्षात येताच बागेश्वर बाबा यांनी पलटी खात मी कोणत्याही संतांच्या किंवा चांगले काम करणाऱ्यांच्या विरोधात नाही तसेच माझ्या प्रवचनात मी बाबा जुमदेव यांच्याबद्दल चुकीचे काहीही बोललो नाही असे ते म्हणाले. त्याच प्रमाणे, मी काल जुमदेव बाबांचे मानसपुत्र रमेशबाबु यांच्याशी बोललो असून त्यांनी सांगितले की, यात काही लोक राजकारण करीत आहेत , बाबा जुमदेव यांनी कधीही आई वडीलांची पूजा करण्याचा विरोध केला नसल्याचे त्यांनी सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.