बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही महिन्यांपूर्वी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी सतीश उर्फ खोक्याचा विषय समोर आणला जात आहे, असा आरोप देखील करण्यात येत आहे. यावर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले धनंजय देशमुख? संतोष अण्णा देशमुख यांच्या आरोपींना जे वाचवायला जातील काही दिवसात त्यांना नियती त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही. हेतूपरस्पर कोणी जर या प्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आरोपीला कोणी वाचवायचा प्रयत्न केला, तर नियती त्याला सोडणार नाही. असे धनंजय देशमुख म्हणाले. बीड न्यायालयात चालणार खटला संतोष देशमुख प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयात चालवला जाणार आहे. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे त्या अनुषंगाने हा खटला बीडला चालवण्यात येणार आहे.