Devendra Fadnavis : वंदे मातरमबाबत काँग्रेसची भूमिका मानसिक गुलामगिरीची; देवेंद्र फडणवीस यांची टीका
राष्ट्रीयगीत वंदे मातरमचे केवळ दोनच कडवे गाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी टीका केली. हा निर्णय संविधानाच्या विरोधात असून तो विरोधी पक्षाच्या मानसिक गुलामगिरीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले.

Devendra Fadnavis : राष्ट्रीयगीत वंदे मातरमचे केवळ दोनच कडवे गाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी टीका केली. हा निर्णय संविधानाच्या विरोधात असून तो विरोधी पक्षाच्या मानसिक गुलामगिरीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले.
नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने बुधवारी १९३७ च्या ठरावाचे पालन करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, यापुढे पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे केवळ दोनच कडवे गायले जातील. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय गीताचे पूर्ण रूप न गाता त्याचा अपमान केल्याचा आरोप भाजपने काँग्रेस नेत्यांवर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
असा निर्णय संविधानाच्या विरोधात आहे, कारण भारत आता ब्रिटीश राजवटीखाली नाही. भारताच्या संसदेच्या निर्णयांना घटनात्मक अधिकार असतो आणि जर आपण स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेल्या निर्णयाचे पालन केले नाही, तर ते गुलामगिरीची परंपरा जिवंत ठेवतील, असे ते म्हणाले.
आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत, की ही मानसिक गुलामगिरी आहे. या निर्णयाद्वारे त्यांनी आपली मानसिक गुलामगिरी आणि संविधानाला असलेला विरोध, या दोन्ही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
हा एकतर्फी संवादच
छात्रों की गूंज उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ही आनंदाची बाब आहे, परंतु हा कार्यक्रम एका नियंत्रित वातावरणात (कंट्रोल्ड सेटिंग) आयोजित केला जाईल. पण सर्वांशी मुक्त संवाद साधला गेला असता तर आम्हाला आनंद झाला असता.
माझ्या माहितीनुसार, ते काँग्रेस नेत्यांनी चालवलेल्या महाविद्यालयांमधील नोंदणीकृत विद्यार्थ्यांशीच संवाद साधणार आहेत. पण ठीक आहे; ते विद्यार्थी सुद्धा आपलेच आहेत. ते अशा लोकांना आणण्याचा प्रयत्न करतील जे आधीपासूनच त्यांच्या विचारसरणीशी (Devendra Fadnavis) सहमत आहेत. आपण याला छात्रों की गूंज म्हणू शकतो, पण त्याचबरोबर, आमंत्रित केलेल्या काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून पाहता, हा मूलतः एकतर्फी संवादच आहे, असे फडणवीस म्हणाले.






