contract workers recruitment – राज्यातील वादात सापडलेला कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जीआर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी काॅंग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना गट, राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका केली असून राज्यातील कंत्राटी भरतीचे 100 टक्के पाप हे त्यांचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
त्यांच्या पापाचे ओझे आपण का उचलायचे?
म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी माफी मागावी, त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना जनतेत उघडे करावे लागेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 20, 2023
फडणवीस म्हणाले, कंत्राटी भरतीचा पहिला जीआर हा 2003 मध्ये काढण्यात आला त्यावेळी काॅंग्रेस आणि शरद पवार यांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती झाली. 2010 साली अशोक चव्हाण यांनी 6 हजार कंत्राटी भरतीचा जीआर काढला. त्यानंतर 2014मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भरतीचा जीआर काढला होता. एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्ट त्यामध्ये होत्या.
कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप,
हे ऊबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे. हे 100% त्यांचे पाप आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #pressconference #Mumbai #Maharashtra#कंत्राटी_भरती…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 20, 2023
त्यानंतर 1 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला, 15 वर्षाकरता कंत्राटी भरतीसाठी एजन्सी तयार करण्यात आली. आमचे सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर यावर लक्ष घातले. कंत्राटी भरतीची सुरवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले.
मुंबईतील पोलिस भरती :
असाच एक भ्रम मुंबई पोलिस दलाबाबत पसरविला जातो आहे.
मुंबई पोलिस दलात कंत्राटी भरती नाही.
नियमित पोलिस भरती सुरु : 18,331
यात मुंबईतील 7076 पोलिस शिपाई आणि 994 वाहनचालक
परंतू नियमित पोलिस भरतीत नियुक्ती पत्रे दिल्यावर वर्षभराचे प्रशिक्षण यात वेळ जातो.
तोवर…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 20, 2023