Devendra Fadnavis : सर्वेक्षणानंतर तातडीने मदत देणार; फडणवीसांचे मंत्र्यांना पाहणी करण्याचे निर्देश
मंत्र्यांना आपापल्या क्षेत्रातील प्राथमिक पाहणी करण्याचे आणि पूर्वतयारीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी सांगितले.

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Devendra Fadnavis) या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्र्यांना आपापल्या क्षेत्रातील प्राथमिक पाहणी करण्याचे आणि पूर्वतयारीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले, पावसातील खंडामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी यावर चर्चा केली. मी त्यांना जिल्ह्यांत प्राथमिक पाहणी करण्याचे आणि पूर्वतयारीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले.
मला वाटते की, पुढील आठवड्याभरात आम्ही प्राथमिक आढावा पूर्ण करू. त्यानंतर आम्ही पिकांचे अधिकृत सर्वेक्षण (पंचनामे) करू आणि तातडीने मदत देऊ. कर्जमाफीचे कामही सुरू असून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
उर्वरित याद्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मी दिले आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली तातडीची मदत सरकारकडून दिली जाईल. तसेच पिण्याचे पाणी आणि चारा यांचीही व्यवस्था केली जाईल. एल निनोमुळे संकट ओढवण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने वैरण विकास कार्यक्रम सुरू केला होता, ज्याद्वारे चाऱ्याची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आम्ही शेतकऱ्यांना संध्याकाळच्या वेळी अतिरिक्त वीज मिळण्याची व्यवस्थाही केली आहे. आता आम्ही विविध भागांत अतिरिक्त वीज पुरवठा करत आहोत. सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ४ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर ९ जुलैपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सूनने) संपूर्ण भारत व्यापला होता. ४ जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत (Devendra Fadnavis) देशाला १५ टक्के पावसाच्या तुटीचा सामना करावा लागला आहे. सध्या, दक्षिण द्वीपकल्पीय भाग सर्वाधिक प्रभावित झाला असून, तिथे पावसाची तूट २९ टक्के इतकी आहे. महाराष्ट्र हा याच द्वीपकल्पीय भागाचा एक भाग आहे.






