sanjay raut – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने 30 दिवसांचा वेळ मागितला. पण आपण 40 दिवस दिले. आता मराठा समाज आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन आहे. राज्यात आणि देशातही मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवणारी एकही शक्ती नाही. कारण, मराठा समाज छाताडावर बसून आरक्षण घेईल. शासनाला आता सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
अशात मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलतांना म्हणले,’शिवसेनेनं मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना या आरोपांवर म्हणाले,’“देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा असून त्यांना सामाजिक जडणघडणीचं पूर्ण भान नाही. छत्री उगवावी तसं त्यांचं मुख्यमंत्रीपद उगवलं होतं. नरेंद्र मोदींच्या कृपेने ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंही मोदी आणि शाहांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले. शिवसेना फोडण्यासाठी त्यांना साधन हवं होतं. सत्ता आणि तपास यंत्रणांच्या मदतीनं शिंदे मुख्यमंत्री झाले.”असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.