राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण….

मुंबई – राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड परिस्थितीचा पुन्हा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री महोदयांचा आहे, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
देशामध्ये काही राज्यात शाळा सुरु केल्यानंतर त्याठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शालेय कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले.
तसेच कोरोना रुग्ण संख्येत अजूनही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी न करता उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.





