PM मोदींनी केले दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, जाणून घ्या त्यासंबंधित 10 मोठ्या गोष्टी

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित केला. दौसा येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी पायाभरणी केली आणि रिमोट दाबून 18,100 कोटींहून अधिक किमतीच्या रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवाशांसाठी पॅसेंजर फॅसिलिटेशन सेंटर, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, ट्रॉमा सेंटर आदी सुविधाही उपलब्ध असतील. यासोबतच यामध्ये हवामानाची माहिती देण्याची सुविधाही असेल आणि प्रत्येक 50 किलोमीटरवर विश्रांतीसाठी एक जागा असेल. या महामार्गावरील कमाल वेग ताशी 120 किलोमीटर असेल.
1) दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट विभाग 246 किमी लांबीचा आहे, जो 12,150 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे.
2) हा विभाग सुरू झाल्याने दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे.
3) दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची एकूण लांबी 1,386 किमी आहे.
4) पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, हा विभाग सुरू झाल्यामुळे संपूर्ण प्रदेशात आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
5) या एक्स्प्रेस वेच्या निर्मितीमुळे दिल्ली-मुंबई प्रवासाचे अंतर 12 टक्क्यांनी कमी होणार आहे.
6) दिल्ली-मुंबई दरम्यानच्या रस्त्याची लांबी 1,424 किमीवरून 1,242 किमी केली जाईल.
7) तसेच प्रवासाच्या वेळेत 50 टक्के कपात केली जाईल. पूर्वी या प्रवासाला 24तास लागायचे, आता १२ तास लागतील.
8) हा द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल आणि कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडेल.
9) दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा आठ लेनचा प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे असेल जो भविष्यात 12 लेनपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
10) रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे मत आहे की 12,150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेल्या नवीन विभागाचा केवळ सोहना-दौसा विभागातच नव्हे तर संपूर्ण गुरुग्राममधील रिअल इस्टेटवर सकारात्मक परिणाम होईल.





