नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, दिल्ली मुंबई एक्सप्रेस नॅशनल हायवेवर इलेक्ट्रिक केबल टाकून इलेक्ट्रिक बस सुरू केली जाईल आणि दिल्ली ते जयपूर हे अंतर दोन तासांत कापले जाईल. या बसचे भाडे डिझेल बसच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी असेल. हे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल
मेवाडच्या विकासाला गती देण्यासाठी उदयपूरमध्ये २५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या १७ रस्ते प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभाला संबोधित करताना गडकरी म्हणाले, आम्ही बांदिकुई ते जयपूर हा ६७ किलोमीटर लांबीचा चौपदरी रस्ता १३७० कोटींमध्ये बांधत आहोत.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा मोठा महामार्ग आहे. इथे प्राण्यांना रस्ता ओलांडावा लागू नये म्हणून आम्ही प्राणी ओव्हरपास बांधले आहेत. मला खूप आनंद होत आहे की आम्ही राजस्थानचे रस्ते जगाच्या रस्त्यांच्या बरोबरीने बनवत आहोत.
केंद्र सरकार राजस्थानमध्ये ६०,०००० कोटी रुपये खर्चून एक्सप्रेस हायवे बनवत आहे आणि १३८२ किमी लांबीचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे १ लाख कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. त्यापैकी २२,००० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे