दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर ईडीने छापेमारी केल्यानंतर आम आदमी पक्षांच्यावतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.सिसोदिया प्रकरणानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार रोज सीबीआय आणि ईडीचा खेळ सुरु करते अशात देशाची प्रगती कशी होणार असा सवाल यावेळी केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, “सामान्य माणूस महागाईशी झुंज देत आहे, कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांसह बेरोजगारी आणि महागाईशी लढले पाहिजे. त्याऐवजी ते संपूर्ण देशाशी लढत आहेत. रोज सकाळी सीबीआय ईडीचा खेळ सुरू करतंय. अशात देशाची प्रगती कशी होणार?”
ऐसे समय जब आम इंसान महंगाई से जूझ रहा है, करोड़ों की संख्या में युवा बेरोज़गार हैं, केंद्र सरकार को सभी राज्य सरकारों के साथ मिलकर बेरोज़गारी और महंगाई से लड़ना चाहिए।उसकी बजाय ये पूरे देश से लड़ रहे हैं। रोज़ सुबह उठकर CBI ED का खेल शुरू कर देते हैं। ऐसे देश कैसे तरक़्क़ी करेगा?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 21, 2022
आम आदमी पार्टी (आप) ने शनिवारी आरोप केला की भारतीय जनता पक्ष दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याबद्दल सतत खोटे बोलत आहे या आशेने की एक दिवस लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतील. आप म्हणाले की, सिसोदिया यांच्या घरावर 15 तासांच्या सीबीआयच्या छाप्यामध्ये आणि देशभरात 30 ठिकाणी छापे टाकून काहीही मिळाले नसल्याचे आपच्यावतीने सांगण्यात आले.