मुंबई – शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेद्वारे शिवसैनिकांशी संपर्क साधताहेत. काल भिवंडीमध्ये शिवसैनिकांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांबाबत भाष्य करत त्यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिल होत. त्यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. मुंबईत पत्रकारांशी बोलताना केसरकरांनी आमदारांवर होणाऱ्या टीकेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय.
“आम्हा शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे. तुम्ही कितीही यात्रा काढा, पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलणार,” असा इशारा केसरकरांनी यावेळी दिला. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केलेली प्रत्येक टीकेला यावेळी केसरकरांनी उत्तर दिल. विशेष म्हणजे यापूर्वी शिवसेनेत बंड केलेल्या नारायण राणेंचे उदाहरण देखील यावेळी केसरकरांकडून देण्यात आले.
नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी कोकणावर अन्याय झाला असं लोकांना वाटलं. त्यावेळी शाम सावंत यांच्या व्यतिरिक्त सेनेचे सर्व उमेद्वारे पराभूत झाले होते हा इतिहास आहे, धमक्या कोणाला देता कोणीही घाबरत नाही असही केसरकर यावेळी म्हणाले. दीपक केसरकर यांच्यासोबत यावेळी दादा भुसे, संजय राठोडदेखील उपस्थित होते.