बारामती- शहरातील नीरा डावा कालवालगत असलेले दत्त मंदिर रात्रीत हटविले आहे. कालव्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने हे मंदिर हटविले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रशासनाच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बारामतीत विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे. त्यामुळे शहरात विकासकामे जोरात सुरू आहेत. कालव्याचे सहा किलोमीटर अंतरावर सुशोभीकरण होत आहे. या सुशोभीकरणामुळे शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे. तरी कालव्यालगत असलेले दत्त मंदिर रात्रीत हटविले आहे.