केंदूर -पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील पद्मावतीवस्तीमधील गणेश गावडे यांच्या केळीच्या बागाचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल नऊ एकर क्षेत्रामध्ये गावडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केळीची बाग उभी केली आहे. त्यासाठी आत्तापर्यंत पंधरा लाखांहून अधिक रुपये खर्च केला आहे.
मात्र, ही बाग (दि.3) वादळाच्या तावडीत अडकल्याने अनेक केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. केळीचे गड वाऱ्याने गळून पडले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या बागांचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी गावडे यांनी महसूल व कृषी विभागाकडे केली आहे.