D.Y.Patil Death: महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वाला मोठा धक्का! पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे निधन ; शिक्षण अन् राजकीय वर्तुळात शोककळा
D.Y.Patil Death: शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूर याठिकाणी निधन झाले.

D.Y.Patil Death: शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूर याठिकाणी निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (D.Y.Patil Death)
गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल असणारे डॉ. डी. वाय.पाटील यांच्या जाण्याने शिक्षण आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
ज्ञानदेव यशवंतराव पाटील, म्हणजेच डी. वाय. पाटील, हे देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून ओळखले जात होते. ‘शिक्षणसम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. (D.Y.Patil Death)
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक म्हणून त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे जाळे उभे केले. त्यांच्या नावाने अनेक महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालये कार्यरत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. (D.Y.Patil Death)

D.Y.Patil Death: महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वाला मोठा धक्का! पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे निधन ; शिक्षण अन् राजकीय वर्तुळात शोककळा
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या डी. वाय. पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात राजकारणातून केली. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ ते १९७२ या कालावधीत त्यांनी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र १९७८ च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचा सक्रिय राजकारणातील सहभाग कमी झाला.
वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत शिक्षण क्षेत्राला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. १९८३ मध्ये नवी मुंबई येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील मोठ्या प्रवासाला सुरुवात केली.
पुढे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक संस्थांची उभारणी करत त्यांनी समाजसेवेचा व्यापक आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि प्रेरणादायी नेतृत्व गमावले आहे.
दरम्यान, शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्याने कार्यतपस्वी नेतृत्व गमावले असून, ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी असल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.





