IND vs AUS Final, Kapil Dev :- विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. ट्रेव्हिस हेड हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.
कपील देव यांना निमंत्रणच नाही…
दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयने आतापर्यंत विविध देशांच्या ज्या कर्णधारांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांना या अंतिम लढतीसाठी बीसीसीआयकडून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, भारताला 1983 साली विश्वकरंडक जिंकून देणारे महान कर्णधार कपील देव यांना निमंत्रणच देण्यात आले नाही.
यावर बोलताना कपील म्हणाले, की बहुतेक ते विसरले असतील. त्यांना अन्य गोष्टींची पूर्तता करण्यात खूप वेळ द्यावा लागला असेल. त्यामुळे ते आमंत्रित करण्यास विसरले असावेत. 1983 साली भारताच्या ज्या संघाने विजेतेपद मिळवले होते, त्या सगळ्या खेळाडूंना या सामन्यासाठी बोलावले गेले असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने 141 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.